Followers

Saturday, 12 August 2017

पघा थाेड विचार करून

*गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?*
नक्की वाचा..
तिस वर्षातले बदल या लेखात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.

दोन तिन दशकांआधी आपल्याकडे *सोयाबीन, कापुस* आलं.
*ज्वारी हळुहळू बाद होत गेली*.
ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला.
कडब्याचा चारा नसल्याने गाई म्हशी कमी झाल्या.
२०० बैलांचा गावातला पोळा ५० बैलांवर आला.
“खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं.
*गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड”* असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं.
मग गावाबाहेरील गायरानांवर *अतिक्रमण* झालं.

सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला.
घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं.
एक आधार असायचा.
बिकट परिस्थितीत लोकं *ज्वारीच्या “कण्या”* खाऊन जगली.
ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला.
सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या.
त्यातच *डि.ए.पी*. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली.
एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे, दुसरीकडे त्यात *शेणखताची कमतरता* यामुळे जमीनीची *पाणी धारण क्षमता* आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली.
जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून *भूजल* संपुष्टात यायला लागलं.
(सोयाबीन, कापुससारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली.
एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं.
एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने *शेतक-यांच्या आत्महत्या* वाढल्या.
अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं खराब धान्य कमी भावात ग्रामीण भागात रेशन दुकानात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली.
*त्यातुन लाचारीचा जन्म झाला*.
*लाचारीतुन आत्मसन्मान गेला*.
*आत्मविश्वास गेला*.

*छटाकभर गावात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं.*
ज्यांचे खायचेपण वांदे आहेत त्यांना सुध्दा नेता बनण्याच दिवसा स्वप्न पडू लागली आणि मग शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला.
गावागावात अमूक पक्ष तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले. 
*इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुनसुध्दा वाहायला लागला*.
आपल्याच डोळ्यादेखत *२५ - ३० वर्षांची किती तरी पोरं दारु पिऊन पटापट गेली*?
इलेक्शन आलं, छटाक भर आकाराचं
*गाव विभागलं, दुभंगल*.
यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे *सबसीडीसाठी* चकरा मारणा-या *लाचार शेतक-याची संख्या* वाढायला लागली.

*दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली*, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या *जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले*;

त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला.
सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं.
*शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं*.
त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली.
नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले.
त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या.
नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला.
जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं.
नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली.
तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन आपल्याकडे आल्या.
यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला.
*त्यातच मग सिंचन प्रकल्प आले*.

नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या.
बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली.
त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.

जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून *ज्ञानाची पारंपरिक तिजोरी* रिती व्हायला लागली.
अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले.
याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला.
या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, *शेतमालाचे भाव वधारणे*.
हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा.

शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग *बोंब ठोकणार*. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही.
उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले.
परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली.

शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या.
आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले. 
एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला.

हे सर्व नियोजन बध्द पद्धतीने घडत गेले.
*निदान आपल्या पिढीने यातून  आता तरी  बोध घेऊन आपल्याच मुलाबांळाच भवितव्य सुरक्षित करावे*

*अजुनही वेळ गेलेली नाही.*
*नाहीतर आपल्याच समोर आपलाच अंधार
नक्की विचार करा.

सुजलाम, सुफलाम अशा या देशाचे आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करु या.
धन्यवाद. 🙏🏻🇮🇳

पघा थाेड विचार करून

*गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?*
नक्की वाचा..
तिस वर्षातले बदल या लेखात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे.
शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.

दोन तिन दशकांआधी आपल्याकडे *सोयाबीन, कापुस* आलं.
*ज्वारी हळुहळू बाद होत गेली*.
ज्वारी गेल्याने कडबा (चारा) कमी झाला.
कडब्याचा चारा नसल्याने गाई म्हशी कमी झाल्या.
२०० बैलांचा गावातला पोळा ५० बैलांवर आला.
“खांदेमळणी” सारखे शब्द काळाच्या उदरात गडप झाले. गोधन कमी झाल्याने गावच्या गायरानांचं महत्व कमी झालं.
*गायराण म्हणजे “वेस्ट लॅंड”* असं नवीनच सुत्र चलनात यायला लागलं.
मग गावाबाहेरील गायरानांवर *अतिक्रमण* झालं.

सोयाबीनचा उपयोग स्थानिक ठिकाणी खाद्य म्हणून केल्या जात नाही त्यामुळे अन्न सुरक्षेचा मोठाच प्रश्न निर्माण झाला.
घरात चार पोते ज्वारी असली की कितीही भीषण दुष्काळात तरुन जाता यायचं.
एक आधार असायचा.
बिकट परिस्थितीत लोकं *ज्वारीच्या “कण्या”* खाऊन जगली.
ज्वारीच्या जाण्याने आता तसा आधार गेला.
सोयाबीन हे तेल बियानं, त्यामुळे जमीनीचा कस कमी झाला, नव नव्या बुरशी वाढायला लागल्या.
त्यातच *डि.ए.पी*. सारख्या खताच्या मा-याने मातीची जैविक संरचना बिघडली.
एकीकडे जमीन निकृष्ट होत जाणे, दुसरीकडे त्यात *शेणखताची कमतरता* यामुळे जमीनीची *पाणी धारण क्षमता* आणि जमीनीत पाणी मुरवण्याची क्षमता कमी झाली.
जमीनीत पाणी मुरत नाही म्हणून *भूजल* संपुष्टात यायला लागलं.
(सोयाबीन, कापुससारखी) एकसुरी पीक पद्धती आल्याने शेतातली जैवविविधता झपाट्याने घटली.
एकसुरीपनाच्या शेतीने एकाच वेळी सगळं पीक वाया जाण्याचं प्रमाण वाढलं.
एकाच वेळी सगळं पीक वाया गेल्याने *शेतक-यांच्या आत्महत्या* वाढल्या.
अन्न सुरक्षा नष्ट झाल्याने देशातल्या कुठल्या तरी प्रांतातलं खराब धान्य कमी भावात ग्रामीण भागात रेशन दुकानात पुरवण्याची जबाबदारी सरकारने घेतली.
*त्यातुन लाचारीचा जन्म झाला*.
*लाचारीतुन आत्मसन्मान गेला*.
*आत्मविश्वास गेला*.

*छटाकभर गावात तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर रातोरात वाढदिवसांचे बॅनर लाऊन नेते बनलेल्या भुरट्या नेत्यांचं पीक आलं.*
ज्यांचे खायचेपण वांदे आहेत त्यांना सुध्दा नेता बनण्याच दिवसा स्वप्न पडू लागली आणि मग शेतीच्या चरकातून फ्रेस्टेट झालेल्या युवां ना कधी नव्हे ते महाराष्ट्र अस्मिता, परप्रांतीय वगैरे हेच खरे प्रश्न असल्याचा साक्षात्कार करुन देण्यात आला.
गावागावात अमूक पक्ष तमुक मित्र मंडळांचे फलक झळकायला लागले. 
*इलेक्शन आले अन दारुचा कधी नव्हे एवढा महापुर ग्रामीण भागातुनसुध्दा वाहायला लागला*.
आपल्याच डोळ्यादेखत *२५ - ३० वर्षांची किती तरी पोरं दारु पिऊन पटापट गेली*?
इलेक्शन आलं, छटाक भर आकाराचं
*गाव विभागलं, दुभंगल*.
यातुन तहसील, कृषी विभाग, पंचायत समीतीकडे *सबसीडीसाठी* चकरा मारणा-या *लाचार शेतक-याची संख्या* वाढायला लागली.

*दुध गेलं, तुर, मुग, उडीद गेले, तितर बाट्या गेल्या, कोंबड्या पाळण्यात कमतरता वाटायला लागली*, तणनाशकाच्या फवा-याने बांधावर तना सोबत येणा-या *जंगली भाज्या गेल्या, नद्या नाल्यातले मासे, खेकडे, झिंगे गेले, गायराणातले ससे गेले*;

त्यामुळे प्रथिनांचा, पोषणाचा प्रश्न उभा राहिला.
सकस अन्न नाही, किटकनाशकांच्या सतत संपर्कात, सतत मानसीक तनावात असल्याने ह्रदय रोग, कर्क रोगाचं कधी नव्हे इतकं प्रमाण ग्रामीण भागात वाढलं.
*शेती म्हणजे घाट्याचा धंदा झाल्याने, तिच्या बांधबंदीस्तीकडे कमालीचं दुर्लक्ष झालं*.
त्यातुन पावसाळ्यात शेतातली सुपीक माती नदीत गेली.
नदीचे पुरातन डोह मातीने उथळ झाले.
त्यातुन पाणी जमीनीत मुरवणा-या केशवाहीण्या चोक झाल्या.
नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात शेतीला पुराचा धोका वाढला.
जमीनी खरवडून जाण्याचं प्रमाण वाढलं.
नद्या उथळ झाल्याने मास्यांची संख्या घटली.
तंबू, कन्नाश्या, डोकडे, टेप-या गेल्या अन तिलापीया, ग्रास कार्प, सिल्वर कार्प, आफ्रिकन मागुर परदेशातुन आपल्याकडे आल्या.
यातुनच मासेमारांच्या रोजगाराचा भिषण प्रश्न उभा राहिला.
*त्यातच मग सिंचन प्रकल्प आले*.

नेत्यांच्या, इंजीनीयरांच्या गब्बर पिढ्या सुखनैव नांदू लागल्या.
बियाणे, किटकनाशके अन खतांसाठी बाहेरच्या व्यवस्थांवरचं अवलंबत्व कमालीचं वाढल्याने स्थानिक ठिकाणी पराधीनता वाढली.
त्यातुनच मग नवीन ज्ञान गावात न येणे (उदा. बि.टी. तंत्रज्ञानाचं ज्ञान!) अन पारंपरिक ज्ञानाचा –हास होणे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.

जुनं निसटुन चाललं आणि नवीन येत नाही म्हणून *ज्ञानाची पारंपरिक तिजोरी* रिती व्हायला लागली.
अन दहावी पास कृषी सेवा केंद्र वाले आणि कृषी सहायक शेतक-यांचे गुरुजी झाले.
याच दरम्यान एक मध्यमवर्गीय सुखवस्तू नौकरदार वर्ग हळुहळू उदयास यायला लागला.
या वर्गासाठी महागाईची व्याख्या होती, *शेतमालाचे भाव वधारणे*.
हा वर्ग बोलनारा, लिहणारा, “प्रतिक्रिया बहाद्दर” याला सरकार घाबरुन असणार, हा वर्ग कांद्याच्या भावासाठी सरकार पाडायला मागे पुढे न बघणारा मात्र फेअर अंड लवली साठी कोणत्याही भावाची शहानिशा न करता डोळे मिटून घेणारा.

शेतमालाचे भाव वाढले की हा वर्ग *बोंब ठोकणार*. त्यातुन शेतमालाचे भाव इतर निविष्ठांच्या तुलनेत वाढलेच नाही.
उत्पादन आधारीत बाजारभाव हे शेतक-यांसाठी एक स्वप्नच राहिले.
परिणामत: कृषी उत्पादनात विक्रम करणारा, देशाला अन्न दारिद्र्यातुन बाहेर काढणारा शेतकरी दरिद्रीच राहिला.
सततच्या आर्थिक विवंचनेत आंब्याची, मोहाची झाडं आरामशीनच्या घश्यात गेली.

शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या ह्या आंब्याच्या जाती काळाच्या आड जाऊन कुठून तरी कलमी, बदाम अशा जाती बाजारात दिसायला लागल्या.
आंब्याच्या, मोहाच्या, डिंकाच्या, तेंदुच्या, चाराच्या (चारोळी), बिब्याच्या, मधाच्या, जंगली मशरुमच्या स्वरुपात आणखी किती तरी आधाराचे दोर कचाकच कापल्या गेले. 
एका माती नाला बांधासाठी, पांदण रस्ताच्या दुरुस्ती साठी दहा रुपयांची वर्गनी न देणारा आमचा पठ्ठ्या गावातल्या मंदीर बांधकामासाठी सढळ हस्ते मदत करता झाला.

हे सर्व नियोजन बध्द पद्धतीने घडत गेले.
*निदान आपल्या पिढीने यातून  आता तरी  बोध घेऊन आपल्याच मुलाबांळाच भवितव्य सुरक्षित करावे*

*अजुनही वेळ गेलेली नाही.*
*नाहीतर आपल्याच समोर आपलाच अंधार
नक्की विचार करा.

सुजलाम, सुफलाम अशा या देशाचे आणि जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचे हात बळकट करु या.
धन्यवाद. 🙏🏻🇮🇳

Thursday, 10 August 2017

Goat farming


: विशिष्ट जातीची करडे, शेळ्या..... ५००,७००......१०००....२००० प्रती किलोने नविन शेळीपालकांना भुलवून विकली जातात, शेळी पालन प्रामुख्याने  मटन साठीच केले जाते, मटनाचा ४०० रुपये किलोचा भाव विचारात घेता मटनसाठी शेळी, बोकड जिवंत प्राणी १५०  ते २२० प्रती कीलो या भावात विकली जातात.  नविन शेळीपालक पाळण्यासाठी घेत राहतील ह्या शेळी पालकांनाही असेच नविन शेळीपालक उफलब्ध होत राहतील तोपर्यतच हे असे तगडे भाव चालतील...आत्ताच नविन शेळीपालकांना आसे महाग भावात शेळ्या बोकड खरेदीदार मिळणे मुष्किल होत आहे... यया बाबीचा विचार करता मटनासाठीचा भाव विचारात घेवून नविन शेळीपालकांनी व्यवसाय सुरु करतांना तशाच भावातील शेळ्या खरेदी करुन व्यवसाय सुरु करावा...असे मत  सार्वत्रिक होत आहे.... काय करावे.... चर्चा करा... जे शेळीपालक अशा तगड्या भावाने विक्री करत आहेत ते या मताशी सहमत होणार नाहित....खुप महाग खरेदी करुन ईमु पालन खरेदी करणारे सीरुवातीचे काही व्यावासायिकांनी पैसे कमावले....पण आता यांची खरेदी बंद झाली.... सर्वाःचा व्यवसाय तोट्यात गेला.. सध्या ईमुपालन बंंद झाले आहे...   बोअर जातीचे वइतर सर्व महाग  जातीचे मटन म्हणून महाराष्ट्रात  कोठेही मटन मिळत नाही....... ...याचा विचार अवश्य करा....
नविन शेळीपालक यांनी महागडी खरेदी करुन व्यवसाय करु नये.. गावठी... परिसरात मिळणाऱ्या शेळ्या खरेदी करुनच व्यवसाय सुरु करावा.... आहार, आरोग्य, व्यवास्थापनावर भर देवून निवड फद्धतीने आपल्या  कळपाचा वंश सुधारणा करावी... उदा. गरिबाघरची मुलगी श्रीमंत घरात लग्न करुन गेली.. गेली दोन्ही वेळचा आहार चांगला, मानसिक तणाव नाही, कष्टाची कामे नाहित..... तर तीची वर्षभरातच तब्येत सुधारते...तीची मुलही सुदृढ जन्माला येतात.......असाच काहिसा विचार करावा...
ईमु पालकांचे आसेच हाल झाले... अनेकांना त्यांना पोसणे कठीण झाले.... खरेदीदार बंद झाले... शेवटी जंगलात सोडून द्यावे लागले.... नविन शेळीपालकांनी बोआर व इतर महाग खरेदी बंद करा....वर्षभरातच ही महाग विक्री बंद होईल.. गुणवत्ता म्हणून ४०० रुपये पर्यत बियाणे म्हणून हरकत  नाही... विचार करा....विचार करा...विचार करा.. .. विविध w app  समुह व प्रशिक्षणात भुलवून १०००,२००० रुपये किलो विक्री केली जाते... या बाबीचा अंत होण्याची ही वेळ आहे... नविन शेळीपालकांनी हजारदा विचार करावा..... मटण विक्री इतकाच विचार करुन निर्णय घ्या...
शेळ्याचा आहार, आरोग्य  याबाबत अनुभवांची देवाण घेवाण करा.... महागड्या विक्रेत्यापासून लांब रहा... फसु नका.... इतरांनाही फसू देवू नका....... आपण फसलात म्हणून ईतरांनाही फसवू नका..
बोअर व इतर महागडे विक्रेते/  विकणारे समुहात गर्दी करुन दिशाभुल करत असतील तर दुर्लक्ष  करा........: हा संदेश विविधा समुहात टाका चर्चा करा... नव्याने या व्यवसायात येणाऱ्या  सदस्यांनी एकत्र  यावे... परस्परांना सहकार्य व मार्गदर्शन करावे...महागडे विकणारे समुह चालवत आहे व नविन बकरे गळास लावत आहेत हे चित्र बदलवा...

Wednesday, 9 August 2017

हवामान

पावसाचा खंड
२० ऑगस्ट२०१७

हवामान विभाग; खरीप संकटात

पुणे (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याने पाऊस लांबला आहे. जोरदार पावसासाठी २० अॉगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार असून, हवेचा कमी दाब असलेल्या काही ठिकाणी हलक्या सरी बरसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या खंडामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील खरीप संकटात सापडला आहे.

सध्या अरबी समुद्रात हवेचा दाब जास्त असल्यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार होत नसल्याचे चित्र आहे. अशी स्थिती अजून चार ते पाच दिवस राहील. पंधरा आॅगस्टनंतर ही स्थिती बदलली तर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज आहे.
- सुनीता देवी, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे.

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हवेचा दाब कमी अधिक आहे. त्यामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी ऊन असून, काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. त्यामुळे हवेत दमटपणा वाढून आर्द्रतेत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची चिंता लागून असून, पिकेही पाण्यावाचून अखेरची घटका मोजत आहेत. बऱ्याच धरणांतील पाण्यानेही तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे.

सध्या अरबी समुद्र आणि महाराष्ट्र या भागात १००६ ते १००८ हेप्टापास्कलएवढा हवेचा दाब आहे. उत्तरेकडील हिमालयासह आसाम, उडिसा व बिहार राज्यात हवेचा दाब १००४ हेप्टापास्कलएवढा आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून वारे उत्तरेकडे सरकत आहे. परिणामी राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे राज्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
कोकणाच्या काही भागांत हवेचा दाब कमी आहे. तेथे अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हवेचा दाब अधिक असल्याने पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. १४ आणि १५ आॅगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील वाल्पोई, कल्याण, दाडोमार्ग, संगमेश्वर देवरूख येथे सोमवारी (ता. ७) रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तसेच कोयना, लोणावळा, शिरगाव घाटमाथ्यावरही हलक्या सरी कोसळल्या. परंतु मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हवेचा दाब १००६ हेप्टापास्कलच्या दरम्यान आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारलेली आहे.
विदर्भात काही ठिकाणी हवेचा दाब कमी होता. त्यामुळे भिवपूर, पवनी, मूळ, नागभिर, उमरेड, आरमोरी, चंद्रपूर, गडचिरोली, चिखलदरा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता. ८) कोकणातील काही ठिकाणी व घाटमाथ्यावर अधूनमधून हलका पाऊस पडत आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी ऊन पडले असून वातावरणात काही प्रमाणात दमटपणा वाढला होता.
-------------
शनिवारपर्यंत हलका पाऊस
कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी शनिवारपर्यंत (ता. १२) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बसतील. आज (बुधवार) कोकणातील अनेक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
---------------
मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटर)
कोकण ः वाल्पोई ५०, कल्याण ४०, दोडामार्ग, संगमेश्वर देवरूख ३०, लांजा, मुंबई, पोलादपूर, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वाडा २०, कानकोण, इला, जव्हार, कणकवली, कर्जत, म्हसाळा, मुल्दे, पणजी (गोवा), पेण, राजापूर, रोहा, सांकेलिम, श्रीवर्धन, वैभववाडी १०.
मध्य महाराष्ट्र ः गगनबावडा, गारगोटी १०.
मराठवाडा ः गंगाखेड, लोहा, पालम ३०, आष्टी, बिलोली २०, हिमायतनगर, जिंतूर, मुदखेड, नायगाव, खैरगाव, पाथरी, वाशी १०.
विदर्भ ः भिवपूर १८०, पवनी ११०, मूळ १००, नागभिर, उमरेड ९०, आरमोरी, चंद्रपूर, चिमूर, काटोल, कही ५०, अर्जुनीमोरगाव, ब्रह्मपुरी, लाखंदूर ४०, देसाईगंज, गडचिरोली, हिंगणा, कुरखेडा, मुलचेरा ३०, बल्लारपूर, धानोरा, हिंगणगट, कळमेश्वर, समुद्रपूर, सेलू, वारद २०, भद्रावती, भंडारा, चार्मोशी, चिखलदरा, कामठी, इटापल्ली, लाखानी, मोहाडी, नरखेड, पोम्भूर्णा, शिंदेवाही, सिंरोचा, तुमसर १०.
घाटमाथा ः कोयना (नवजा) ३०, कोयना (पोफळी) २०, लोणावळा (टाटा) शिरगाव, वळवण, डुंगरवाडी १०.