Followers

Sunday, 30 April 2017

Farmer

शेतकऱ्यांच्या😭 ...कर्ज माफीमुळे जर 😨देशाची आर्थिक परिस्तिथी बिघडते तर वेतन आयोग लागू केल्याने 😱आर्थिक परस्थिती व्यवस्थित राहील काय?

सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांना आमच्यासारखा जोडधंदा करायला सांगा ना....😜

कोंबड्या,गाई,म्हशी पाळायला सांगा..🐓🐐🐃🐄🐄🐃🐐🐓.

दिवसभर नवरा 🕺नोकरी करेल आणि बायको रस्त्याच्या कडेला म्हशी चारेल. 🐃🐃🐃🐃🐃🐃🏃🏻‍♀

त्यामुळे होणारे फायदे.
1)नोकर वर्गाला वेतन वाढ 🤑देण्याची गरज नाही.
2)त्यांना व्यायाम करण्याची गरज नाही 🤸‍♂🏋‍♀🤸‍♀सकाळी 5 वा उठून शेण काढणे वगैरे दूध काढणे दूध विकणे इ. कामे राहतातच.
3)घरच्यासाठी दूध 🥛विकत घेण्याची गरज नाही ते पैसे 🏧देखील वाचतात.
4)नोकर वर्गाने गाई🐄🐂🐃 म्हशी पाळल्याने मुबलक व योग्य दरात दूध उपलब्ध होईल त्यामुळे कुपोषणाला आला बसेल.व यांनाही दूधाचे दोन पैसे मिळतील.
5)शेण🌑 विक्रीतूनहि भरपूर पैसे मिळतील व शेतकऱ्यांना मुबलक व योग्य दरात शेणखत मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पादन 💰वाढ होईल.
6)बायका देखील म्हशी चारण्यात व्यस्त असल्याने शॉपिंग 🛍🛍सारखी समस्या नवर्यांपुढे उद्भवणार नाही.

आणि मग शेतकऱ्याची कर्ज माफी हा मुद्दा किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल.  
😱😜😆😆😅😂😂🤣🤣

 धन्यवाद!

एक वैतागलेला शेतकरी😔

😄😄😅😂😂🤣🤣

*शेतकरी राजा आणि कृषीप्रधान भारत*

*शेतकरी राजा आणि कृषीप्रधान भारत*

तलाठ्याला वाटतं फेरफार साठी शेतकर्याने 30 - 40 हजार रूपये द्यावे कारण पाच एकर जमीन हाय ना. काय मरतो का शेतकरी एवढ्यानं..

बँक मॅनेजर ला वाटते शेतकर्याने लाखाच्या कर्जाला किमान १० हजार रूपये दलाला कडे जमा करावे. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

सोसायटी चेअरमनला वाटतं मीच शेतकऱ्यांला कर्ज वाटप करतो तेव्हा मी लाखामागं १५-२० पंधराविसहजार काढुन घेतलं त काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधडेअरी चेअरमनला वाटतं दुधाचा पगार आपणच करतो मग लिटरमागं चार रुपयं ढापलं त काय झालं. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

दुधसंघाला वाटतं शेतकऱ्यांपेक्षा आपली मेहनत जास्त कारण बाळाला आत जाऊन टँकर धुवा लागतो ना... मग करा दुधाची फँट कमी, काढा लिटरमागं ५ रुपये भाव कमी. मरतो का शेतकरी एवढ्यानं......
 म्हणजे झाला दुधसंघ करोडोपती आणि लागला पठारवरच्या ईलेक्शन जिंकु.

व्याजानं पैसं देणारा सगळं सोनंनानं तर हडप करतोच आणि शेतीलाही गिह्राईक शोधतो एवढ्यावरच त्याचं भागत नाही तर शेतकऱ्याच्या चिमुरडीलाही चिरडण्याचा प्रयत्न करतो. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

भाजीमार्केट दलालांना वाटतं शेतकऱ्यांची पट्टी कधी पेडच करु नाही आणि सगळा पैसा घशात घालावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं......

लाईन वाल्या सायबाला वाटते शेतकर्याने विजबिल पूर्ण भरावं आणि डीपी मेंटनस निघाला तर सर्व शेतकर्यांनी लाख रूपये जमा करून आपल्याकडे द्यावे आणी ते आपण मोठ्या साहेबाला पकडून अर्धे अर्धे खिशात घालावे. वर दिवाळीलापण घरोघरी उकळतोच. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

गावगुंडाला वाटतं आपल्यालाही मोकळ्यामोकळ्या१०- १५ हजार मिळवायचं असेल तर करा त्या शेतकऱ्याचा शेतीचा रस्ता बंद, करा खोटानाटा आरोप आणि उकळा पाहिजे तेवढे पैसे. मरतो का शेतकरी एवढ्यानं

पोलिसाला वाटतं शेतकऱ्यांचे बांधाकोंदावरुन कधी जर लहान सहांन भांडण झालेच तर दोन्ही शेतकर्यांनी मिळुन एजंट, मला व साहेबाला पंचिषेक हजार रूपये द्यावेच. मरतो का शेतकरी एवढ्यानं.....

कृषी विभागातील सायबांना वाटते शेतकऱ्यांसाठी आलेल्या योजना म्हणजे आपल्या बापाच्याच् आहेत , त्या विकुनच् खाव्यात. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

खत बियाने दुकानदाराला वाटते बोगस खत बोगस बियाने शेतकऱ्याला कधी नगदी तर कधी उधार देवुन आपण आपला नफा करून घ्या. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शेतमजुर तर मजुरी देवुन वर दारू ची मागणी करतंय.शेतातला भाजीपाला पाहिजे तेवढा नेतयं आनं नाही म्हणलं तर निघालन काम सोडुन . मरतो का शेतकरी एवढ्यानं....

शहरातल्या लोकांना वाटतं शेतमाल भाजीपाला  १०० रूपयात वर्षभर पुरेल एव्हढा द्यावा. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

TV च्यानल वाल्यांना वाटतं जे शेतकरी म्हणल शेतीत धा लाख उरते अशाच शेतकऱ्यांची मुलाखत दावाव.. आणि उकळावं लाखभर. मरतो का शेतकरी एवढ्यानं....

स्वतःला विद्वान् समजणार्यांना टी व्ही सीरियल मध्ये पाहुन वाटते शेतकरी कष्ट करत नाहीत फक्त गावात आलेल्या मास्तरणीच्या मागे फिरतो राणादासारखं

विरोधी पक्षाला वाटते आपली सत्ता आनायची आसल तर शेतकरीच महत्वाचा..

*आणी सरकारला वाटते शेतकरी हीच देशाची खरी समस्या आहे म्हणून शेतकरी संपला की देशातील सर्व समस्या संपतील म्हणून पहीले यांना संपवा देश आपोआप सुधारेल...*

टीप :- *अजुन कुणाचे काही राहीले असतील तर हिसाब न देता काढुन घ्या कारण मी शेतकरीराजा आहे आणि माझा देश कृषीप्रधान आहे....* मीच राजा आणि मीच प्रधान मग दोष कुणाला...
लेखक- एक शेतकरीच ...

Saturday, 29 April 2017

Sachin tendulkar ani shetkari

बच्चू कडु यांनी सचिन तेंडुलकरला कबुतर संबोधल...

सचिनच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं...
(जस काय त्यांच्या बापालाच कबुतर म्हटलय)

शेतकर्यांची बाजु सचिनने संसदेत मांडायला हवी...

एकदा भाषण तरी करायला हव संसदेत...

जाहिराती मध्ये व्यस्त असणारा हा भारतरत्न ....

पूलाच्या विकासाला विरोध करणारी
लता मंगेशकर...
या बाईने हॉस्पिटल सुरु केलं..
पण एकाही गरीबाचा इलाज तीथे झाला...
किंवा स्वस्त ईलाज होतो हे दाखवा...

अशी ही भारतरत्न..

रेखा गणेशन
हीच्या संसदेत योगदान मला आजपर्यंत नाही कळालं..

वा रे उमराव जान ...

हे असले नकली आयकाॕन्स
माझे तरी आयकाॕन नाहीत....

आमदार बच्चु कडु हा माणुस आतुन बाहेरुन सारखाच आहे...

जे पोटात तेच ओठात....

स्वतःच्या लग्नात मंगलाष्टकांएवजी *राष्ट्रगीत* लावणारा हा आमदार..

आमदारांच्या वेतन वाढीला विरोध करणारा हा आमदार ...

सचिन, रेखा आणि लता मंगेशकर...
जनतेन भरभरुन दिलंय तुम्हाला...

एकदा तरी परतफेड करा...

*पाणी फाउंडेशन* व
*नाम फाउंडेशन* चे आदर्श आहेतच....

भारतरत्न फक्त पुरस्काराने नव्हे तर कृतीने ही व्हा....

कर्ज माफी

शेतकऱ्यांच्या😭 ...कर्ज माफीमुळे जर 😨देशाची आर्थिक परिस्तिथी बिघडते तर वेतन आयोग लागू केल्याने 😱आर्थिक परस्थिती व्यवस्थित राहील काय?

सातवा वेतन आयोग लागू करण्यापेक्षा त्यांना आमच्यासारखा जोडधंदा करायला सांगा ना....

कोंबड्या,गाई,म्हशी पाळायला सांगा..🐓🐐🐃🐄🐄🐃🐐🐓.

दिवसभर नवरा 🕺नोकरी करेल आणि बायको रस्त्याच्या कडेला म्हशी चारेल. 🐃🐃🐃🐃🐃🐃🏃🏻‍♀

त्यामुळे होणारे फायदे.
1)नोकर वर्गाला वेतन वाढ देण्याची गरज नाही.
2)त्यांना व्यायाम करण्याची गरज नाही 🤸‍♂🏋‍♀🤸‍♀सकाळी 5 वा उठून शेण काढणे वगैरे दूध काढणे दूध विकणे इ. कामे राहतातच.
3)घरच्यासाठी दूध 🥛विकत घेण्याची गरज नाही ते पैसे 🏧देखील वाचतात.
4)नोकर वर्गाने गाई🐄🐂🐃 म्हशी पाळल्याने मुबलक व योग्य दरात दूध उपलब्ध होईल त्यामुळे कुपोषणाला आला बसेल.व यांनाही दूधाचे दोन पैसे मिळतील.
5)शेण🌑 विक्रीतूनहि भरपूर पैसे मिळतील व शेतकऱ्यांना मुबलक व योग्य दरात शेणखत मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पादन 💰वाढ होईल.
6)बायका देखील म्हशी चारण्यात व्यस्त असल्याने शॉपिंग 🛍🛍सारखी समस्या नवर्यांपुढे उद्भवणार नाही.

आणि मग शेतकऱ्याची कर्ज माफी हा मुद्दा किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल.  


 धन्यवाद!

एक वैतागलेला शेतकरी😔

Shetkari

दोन मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा "
" जुगार. ".
-----------------
पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचेआगमन झाले.
ओळखीचे सत्र सुरु करण्यात आले.
तुमचे नाव काय.....?
तुमचे गाव काय....?
असे प्रश्न विचारण्यात आले....
कुणाचे बाबा वकील, डॉक्टर तर कुणाचे
इंजिनीअर.....
माझा नंबर येताच...
.
मी पटकन उभा राहिलो व चटकन सांगितले
“सर, माझे बाबा शेतकरी आहेत.”
मी असं म्हणताच सगळा वर्ग
हसायला लागला.....
मला याचा फार राग आला.....
.
मी म्हटले “सर मी नाही म्हणत,
या साऱ्यांचा धंदा छोटा हाय,
पण,....या काळ्या आईची शपथ
सर...या साऱ्याहून
माझा बाप मोठा हाय....
हाडाची काडं करून रात दिन राबत
असतो,
तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो...
काड्याकुड्याचं जिनं त्याचं
पण,
साऱ्या जगाला भाकर देतो..
अन् साऱ्या जगाला भाकर देणारा,
कधी कधी उपाशीच झोपतो
माहित नसताना पाऊस येईल-नाही येईल,
हजारो रुपये मातीत गाळतो,
खरंच सर तो मातीसंग जुगारच खेळत असतो.
सगळे जण जगण्यासाठी जुगार खेळतात
पण,
माझा बाप जगवण्यासाठी जुगार खेळतो.
अन्,
या जगण्याच्या जुगारीमध्ये तो नेहमीच हरतो.
माणुसकीच्या गावामध्ये अजून त्याची वस्ती हाय,
खरंच सर माझ्या बापाची मरणा संग दोस्ती हाय....
फाटके तुटके कपडे सर
तो अजूनही अंगावर घालतो....,
पण,
सर मला तुमच्या कपडयाचाही
त्याचाच घामाचा वास येतो.
टाकून पहा मातीत सर तुम्ही
पाच-पन्नास हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल,
त्याच्या जगण्याचा जुगार.
म्हणून,
म्हणतो सर अभिमान हाय मला
माझा बाप शेतकरी असल्याचा
अभिमान आहे मला
मी या शेतकऱ्याचा वारस असल्याचा
जग लिहिते आईसाठी,
जग लिहिते साऱ्यांसाठी पण,
मी लिहितो बापासाठी, त्याच्याच
जीवनाचा जुगार........”
दारूचा स्टाॅक संपत नाही
तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
होतो.....
दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा.....
.
बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा
स्टाँक संपेल ना
तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वानसाठी पोस्ट केला पन
जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
मनापासून पटल तर शेअर करा.
.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!

S G PAWAR

Friday, 28 April 2017

Kattapp and farmer's

sa*कटप्पा ने बाहुबलीला का मारले या काल्पनिक आणि हास्यास्पद प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्या देशाचे नागरिक अब्जावधी रूपये रांगेत उभे राहुन (आनंदाने) खर्च करतील आणि सरकार त्यातून करोडो रूपये कमावणार!.....* *मात्र शेतकऱ्याला सरकारने का मारले य़ाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही, किंवा देणारही नाही त्याबाबत अजूनही अभ्यासच चालू आहे, बाहुबलीचा तिसरा पार्ट कदाचित पुढील काळात येईल पण अभ्यास पुर्ण होणार नाही.....*  *#कर्जमाफी*sgpawarfarmersassociation.blogspot.com